राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचे काम करीत होत्या. या महिलेने अतिशय साधेपणाने “या ना शेतात… थोड्या शेंगा खा!” म्हणून बोलावले असता, तेथे थांबलो आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.
त्यांच्या साधेपणात आणि स्वागतात असणारी आपुलकी यावेळी मनाला खूप भावली. शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो. दरम्यान शेतात गेलो, जमिनीवर बसलो, मातीचा गंध घेतला आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिला.
यावेळी पीक, पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या. ही फक्त एक भेट नसून माणुसकीची, मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती. एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली.
मा.खा.सुजय राधाकृष्ण विखे पाटील.




















