प्रतिनिधी
वाढते वंध्यत्व ही महिलांना भेडसावणारी मोठी समस्या व चिंताजनक बाब बनली आहे या समस्येला घाबरून न जाता वंध्यत्वावर मात करण्यासाठी महिलांनी फास्ट फूड कडे पाठ फिरवून सकस संतुलित आहार घ्यावा तसेच नियमित व्यायाम व योगा करणे गरजेचे आहे दैनंदिन योगा व व्यायाम केल्याने वंध्यत्वावर मात करून नैसर्गिक रित्या मातृत्व प्राप्त करणे शक्य आहे.असे प्रतिपादन प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ निर्मला गाडेकर यांनी केले
योग दिनानिमित्त महिलांचे आरोग्य व व्यायाम याविषयी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना राहाता येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. निर्मला गाडेकर म्हणाल्या की फास्ट फुडची वाढती सवय व्यायामाच अभाव धावपळीचे जीवनमान यामुळे तरुण मुली व महिलांमध्ये दिवसेंदिवस स्थूलता अधिक वाढत आहे बदलत्या व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे युवती तसेच तरुण महिलांमध्ये मासिक पाळी विषयीच्या विविध समस्या व व्याधीं उद्भवत आहे ही महिलांच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे आज सर्वांचे जीवनमान धावपळीचे झाले आहे. तणावपुर्ण जिवन शैलीमुळे तरूण महिलांमध्ये मासिक पाळी विषयीच्या समस्यां वाढतात त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे नाहीतर वंध्यत्वाला सामोरे जावे लागते तरूण मुलींमध्ये पाळी अनियमित असणे, स्थुलता येणे, चेहरा व शरीरावर केस वाढणे, तोंडावर मुरूम, पुटकुळया येणे हे शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे ९० % मुलींमध्ये हल्ली पीसीओडीची लक्षणे दिसून येतात परंतु त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बीजांडात स्त्रीबीज तयार होत नाही व लहान लहान गाठी तयार होतात. संप्रेरकांच्या असंतुलतेमुळे बीजांडातून स्त्रीबीज (अंडी) गर्भाशयात जाण्यास उशीर होतो. परिणामी स्त्रीबीज तयार न हाणे, अनियमित मासिक पाळी यामुळे महिलांमध्ये नैसर्गिक गर्भधारणा होत नाही. त्यासाठी तरूण महिलांनी वेळेवर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेणे महत्वाचे आहे. संतुलीत आहार, व्यायाम, औषधोपचारा मुळे गर्भधारणा अनुभवता येते. त्यासाठी धकाधकीच्या जीवनात वेळ काढून योगा करण्याचे नियम करावे जीवनात योगाला असाधारण महत्व आहे. आजमितीला भारतातच नव्हे तर संपुर्ण
जगाला योगाचे महत्व कळाले आहे. योगामुळे जीवनशैली व मानसिक आरोग्य सुधारते
व रुग्णांची कार्यक्षमता वाढते. योगामुळे मुलांमध्ये वाढलेली नकारात्मकता,चिडचिडेपणा, अभ्यासातील ताण-तणाव कमी होतो. योग अभ्यासामुळे एकाग्रता वाढते व सकारात्मक शारिरीक वाढ होण्यास मदत होते. योगामुळे सुदृढ व निरोगी शरीरा सोबतच वंधत्वावर मात करून नैसर्गिकरीत्या मातृत्व प्राप्त करता येते याकरिता महिलांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनात व धावपळीच्या युगात अधिक महत्त्व द्यावे असे आवाहन स्त्रीरोग तज्ञ डॉ निर्मला गाडेकर यांनी केले आहे.




















