*आपल्या साकुरी गावच्या शिरेपेचात मानाचा आणखी एक तुरा*….. साकुरी च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय मेघना संदीप दंडवते यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा मानाचा व प्रतिष्ठेचा *”आदर्श सरपंच पुरस्कार”* मिळाल्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा…. पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असो, तो मिळण्यासाठी करावे लागतात ते अफाट कष्ट,मेहनत व असावी लागते ग्रामसुधारणेची अद्भुत जिद्द…. जी सध्याच्या सरपंच मेघनाताई यांच्याकडे आहे. ही जिद्द, ही तळमळ गेल्या तीन-साडेतीन वर्षातील साकुरी गावात केलेल्या विविध विकास कामातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते.वेळ-प्रसंग कोणताही असो,ऊन-वारा -पाऊस, दिवस – रात्र काहीही न बघता केवळ समाजासाठी,गोरगरिबांसाठी व समाजातील सर्व घटकांसाठी शासनाकडून आलेली प्रत्येक योजना कशा राबवता येईल व त्यातून गावाचा विकास कसा होईल.हे सदैव लक्षात ठेवूनच त्यांनी आपले मार्गक्रमण केले आहे.गावाचा, समाजाचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी आवश्यक असते,या दूरदृष्टीनेच सन्माननीय सरपंचांनी आपल्या गावचा विकास कसा होईल,गावातील रस्ते, ड्रेनेज,लाईटची सुविधा या पायाभूत सुविधा मध्ये निश्चित चांगली कामे करत आहात मागील वर्षी दुष्काळ पडायचं सावट असताना रोडच्या अंडरग्राउंड पाईपलाईन करून नदी मधून बारवा मध्ये पाणी घेतले तसेच ग्रामपंचायत कार्यालय पुढे बोर घेतले त्याला पण खूप पाणी लागले गोदावरी वसाहत बोरवेल ते शेजारच्या तळ्याच्या विहिरीत पाणी घेतलं त्याला पण भरपूर पाणी लागले आज एवढा कड़क उन्हाळा असून सुद्धा कुठेही पाण्याची कमतरता काही काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागले शिर्डी शिवाला अनाधिकृत 25 ते 30 कनेक्शन हॉटेल वलॉजिंग चे तोडावे लागले काही कामगारांच्या बदल्या कराव्या लागल्या त्या ठिकाणी कुठलीही तडजोड केली जात नाही. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली महिला सबलीकरण च्या माध्यमातून हळदीकुंकू, होम मिनिस्टर, मुलींसाठी मोफत कराटेचे प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, क्रिकेटच्या स्पर्धा या माध्यमातून एक मोठी संघटना उभी केली विशेष करून कोण गरीब कोण श्रीमंत याचा अजिबात विचार न करता सर्व समाजातील महिलांना योग्य न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे, गावातील शाळांना डिजिटल बोर्ड व्यायाम शाळा, कॅमेरे ,शैक्षणिक साहित्य व ज्या- ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व देण्याचा अत्यंत प्रामाणिक पणे प्रयत्न केला आहे . जिथे कुठे वाद होईल अन्याय होईल त्या स्वतः त्या ठिकाणी उभ्या राहून त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत असतात आज हक्काने महिला सरपंच सरपंच असताना सर्वसामान्य नागरिक त्यांना हक्काने आपल्या समस्या त्यांना फोन करून मांडत असतात साकुरी हे मोठं व्यापारी केंद्र बनलेला आहे प्रशासनावर धाक असल्याकारणाने अनेक मोठमोठे उद्योग व व्यापार साकुरीत तीन-चार वर्षात सुरू झालेला आहे त्यामुळे आज बाहेरील उद्योजक,व्यापारी किंवा महिला असतील यांना सुरक्षिततेची भावना या गावांमध्ये निर्माण झालेली आहे.हा आदर आणि हा विश्वास त्यांनी आपल्या कामातून कमावलेला आहे.या सर्व कामांची पावती म्हणूनच त्यांना देशातील एक मोठ्या असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे.
*”कुणी कौतुक करो या टीका,लाभ आपलाच आहे.कारण कौतुक प्रेरणा देते,तर टीका प्रत्युत्तर!”* याप्रमाणे या राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री *माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , व युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील* या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कितीही संकटे आली कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी *”निंदकाचे घर असावे शेजारी,अंगणी अंगणी पाणी ! निंदक आमुची काशी, आमची पातके अवघी नाशी!”* याउक्तीप्रमाणे मा.सरपंच आपल्या ग्राम सुधारणेचा वसा यापुढे सुरूच ठेवतील या सदिच्छेसह पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा….यावेळी उपसरपंच सविता नजन,दिलीप बनसोडे,लता आरणे, रूपाली रोहोम कल्पना रोहोम, पुंडलिक बावके, शिवाजी नजन,श्रद्धा दंडवते, गीतांजली श्रीखंडे,संदीप दंडवते , ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत, शिंगारे व ग्रामपंचायत कर्मचारी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.






















