मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर चूक काय : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठराखण तर दुसरीकडे टोलेबाजी
राहाता येथे सांगता सभा

- राहाता :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२९ मध्ये पंतप्रधान होण्याच्या रेस मध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रातील पंतप्रधान होत असेल तर तो आपला अभिमान आहे असे सूचक वक्तव्य शिर्डी येथील पत्रकार परिषदेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या, एकमेकांचे छत्रू मानले जाणारे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदासाठी एक होताना दिसत आहे, परंतु सभेतील टोलेबाजीमध्ये वाक्प्रचार तुम्हाला समजत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडून शिकून घ्या, विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता येत नाही ते कारभार पाहता असे बोलत फडणवीस यांच्यावर टोला लगावला, याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पंख छाटले जात आहे असे प्रतिपादन याआधी उद्धव ठाकरे यांनी केले यावर फडणवीण म्हणाले मी काय पक्षी आहे का त्यामुळे या वाक्प्रचाराचा अर्थ फडणवीस यांनी शिकून घेण्याची गरज ठाकरे यांनी व्यक्त केली . राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना सर्व कळत आहे, परंतु सहन होत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
शिंदेसेनेत गेलेल्या सहा खासदारांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सोमवारी राहाता येथील सिद्ध संकल्प लॉन्स येथे जाहीर सांगता सभा झाली यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले खाऊसाहेब वाकचौरे सापडला तर सोडू नका, जे होत ते चांगल्यासाठीच होत असत आणि गद्दार हे आपल्याबरोबर नकोच, वाकचौरे जास्त बोलल्यावर तुला मारतील म्हणून भाऊसाहेब वाकचौरे मला देवमाणूस म्हणतात . आमदार फुटतात, खासदार फुटतात आणि आता पेपर फुटतात यामुळे विद्यार्थ्यांचे नशीब देखील फुटत आहे, काहीही झालं का फक्त जयश्रीराम, निव्वळ फक्त जयश्रीराम यांना येत . यापुढील मुख्यमंत्री मला आपल्या शिवसेनेचा पाहिजे आणि शिर्डी मतदारसंघात पुढील खासदार हा शिवसेनेचाच होणार आहे. हा खाऊसाहेब वाकचौरे साईबाबांचा देखील नैवद्य खातो , एवढा कोटीचा निधी मिळालेला असताना १३५ गावातील फक्त दोन कामे याने केली . असे बोलत फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला .
शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष सचिन कोते हे नेते रात्री शिर्डी येथील सन ॲन्ड सण हॉटेल मध्ये मुक्कामी होते, सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी साईदर्शन घेतले, त्यानंतर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली व नंबर राहाता येथे जाहीर सभा पार पडली, यावेळी प्रवेश होत असताना मोठा हार घालत त्यांचे जल्लोषात यावेळी स्वागत करण्यात आले .
_________________
१ रुपया खर्च न करणारा खासदार १०० कोटी घेऊन पळाला : संजय राऊत 
उद्धव साहेबांची याने माफी मागितली, तीन वेळा याने साई बाबांची खोटी शप्पत घेतली, सापडला तर याला रस्त्यात तुडवा, एक रुपया खर्च न करता खासदार झालेला माणूस १०० कोटी घेऊन गेला, वाकचौरे यांना भीक लागली आहे,हे गद्दार वाहून जाणार पुन्हा यांचे लोकसभेत तोंड दिसणार नाही अशी टोलेबाजी खासदार संजय राऊत यांनी केली .
_____________
महिला आरक्षण आणणार
महिलांवर रोज अन्याय तसेच अत्याचार होत आहे, आत्ता ५५० खासदारांमध्ये दया महिला आरक्षण, महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे यांना विभाजन करायचे आहे, महिला विधेयक मंजूर होण्यासाठी २/३ बहुमत लागत होते परंतु ते आम्ही हाणून पाडले, परंतु आता फोडाफोडीतून हे पुन्हा महिला आरक्षण विधेयक मंजूर करू शकतात असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.





















