#राहाता नगरपरीषद हद्दीतील चारी नं 14 मधे कॅनाॅल मधुन सोडलेले पाणी चारीवरील डिवाईडर मधील चेंबर काही लोकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे चोकअप असल्यामुळे रोडवर निघाले व गौतमनगर परीसरातील गायकवाड दांपत्याच्या घरात पाणी शिरले .
सदर घटनेची माहीती मिळताच डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष)समवेत उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नगरसेवक ॲड.मयुर पाळंदे, माजी नगरसेवक भीमराव निकाळे व श्री. सुयोग शेळके, शहरातील तरुण स्वयंसेवक भुषण कुंभकर्ण, प्रज्वल सोनूळे, कृष्णा पैठणकर, सिराज शेख, इकबाल भाई शेख, संदीप लुटे, प्रणव लुटे, साई पाळंदे, व ईतर आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन भर पाऊसात ऊभे राहुन ऊपाययोजना करून सर्व पाणी जवळील चारीत काढून दिले.

तसेच गायकवाड दाम्पत्यांना अत्यावश्यक मदत केली आणि यापुढे देखील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सदर परिसरातील नागरिकांना विनंती केली की सदर डिवाईडर आपण सुशोभित केले आहे. कृपया त्यात कचरा कोणीही टाकू नये.





















