राहाता प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रभूषण ह भ प संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तनात जाणून-बुजून अडथळा निर्माण केला तसेच भंडारे महाराज यांच्यावर धावून जात कीर्तन बंद पाडले व भंडारे महाराजांच्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली असल्याचा आरोप करत या घटनेचा भारतीय जनता पार्टी राहाता मंडळाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी राहाता मंडल पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटना व कीर्तनकार महाराजांच्या वतीने राहाता पोलीस स्टेशनचें पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे म्हणाले कीं संत महंतांवर बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेला हल्ला आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी केलेला हल्ला आहे. यापुढे पुन्हा असे झाल्यास भारतीय जनता पार्टी असे हल्ले खपवून घेणार नाही.
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ म्हणाले कीं, बाळासाहेब थोरातांचा पराभव पचणी न पडल्यामुळे हा हल्ला केला गेलेला आहे. निवडणुकीपूर्वी देखील त्यांनी असे कृत्य डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या सभेत केले होते. पुन्हा असे झाले तर आम्ही संगमनेरात येऊन निषेध करू असा इशारा सदाफळ यांनी दिला यावेळी भारतीय जनता पार्टीचे राहाता मंडलाचे मंडलाध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, घुलेवाडी संगमनेर येथे हभप संग्राम बापु भंडारे यांच्यावर काँग्रेसप्रणित काही अपप्रवृत्तींनी चालू कीर्तनात धावून जात कीर्तन बंद पाडले, महाराजांच्या गाडीची तोडफोड केली आपल्या नेत्याच्या पराभवाचें आत्मचिंतन न करता पराभवाचे खापर वारकरी संप्रदा्यावर फोडायचे हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे आणि या भूमीत असा प्रकार घडणे हे निंदनीय बाब आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली याप्रसंगी हभप संतोष महाराज दीक्षित, सचिन भैरवकर यांची भाषणे झाली.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर, मंडल सरचिटणीस सचिन भैरवकर, किरण चोळके, अंकुश भडांगे, संतोष सदाफळ, किसान मोर्चा अध्यक्ष विनायक जपे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कापसे, ह भ प संतोष महाराज दीक्षित, ह भ प वीरेंद्र महाराज नळे, नंदकुमार जेजुरकर, सुनील लोंढे, दसराथ तुपे, पंकज कुलकर्णी, प्रवीण सदाफळ, चेतन रणमाळे, हरिभाऊ गाडेकर, रवींद्र आगलावे, गणेश आरणे, ऍड अतुल माळवदे, राजेंद्र साळुंके, देविदास आभाडे, तुळशीराम शिंदे, वाल्मीक मोरे, अजय रोहोम, मयूर मोरे, सागर धुमसे, संदीप गाडेकर, घनश्याम मोरे,पुनीत बर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




















